कृषी पदविका धारकांसाठी सुवर्णसंधी, डायरेक्त्त दुसऱ्या वर्षात प्रवेश!-Golden Opportunity for Agri Diploma Holders!
Golden Opportunity for Agri Diploma Holders!
महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयांमध्ये तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला ३० एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.
प्रवेश प्रक्रियेची माहिती
राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत तीन वर्षांच्या इंग्रजी माध्यमातील कृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मागील वर्षापासून प्रथमच कृषी पदवीच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश देण्याची संधी मिळाली. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (CET Cell) ही प्रक्रिया पार पडते.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राखीव जागा आणि संख्यात्मक माहिती
या योजनेंतर्गत कृषी महाविद्यालयातील एकूण जागांपैकी १०% जागा पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
- मागील वर्षी राज्यभरात सुमारे १८,००० जागा उपलब्ध होत्या.
- यातील १,८०० जागा थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी आरक्षित होत्या.
- यंदा देखील समान प्रमाण राखण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
ही प्रवेश प्रक्रिया कृषी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे. पदविका पूर्ण केल्यानंतर थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतल्याने विद्यार्थ्यांचा एक वर्ष वाचेल आणि त्यांना अधिक संधी उपलब्ध होतील.
महत्वाच्या तारखा
- प्रवेश प्रक्रियेस ३० एप्रिलपासून सुरुवात
- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अर्ज प्रक्रिया सुरू होईल
- अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर माहिती लवकरच उपलब्ध होईल
विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज भरून संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.