RTE अंतर्गत प्रवेश करण्याची अंतिम संधी, २४ पर्यंत “या” लिंक वर अर्ज सुरु!-Final Chance for RTE Admission!
Final Chance for RTE Admission!
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५% राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रियेत आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत प्रवेश न घेतल्याने, उर्वरित रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. ही प्रवेश प्रक्रिया १८ मार्चपासून सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी २४ मार्चपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर उर्वरित रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादीतील इतर विद्यार्थ्यांची सोडत काढली जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.
राज्यातील आरटीई प्रवेशाचा आकडेवारीनुसार आढावा
यंदा राज्यभरातील ८,८६३ शाळांमध्ये एकूण १,०९,०८७ आरक्षित जागा उपलब्ध होत्या. या प्रवेशासाठी तब्बल ३,०५,१५२ अर्ज दाखल झाले होते. सोडतीद्वारे एकूण १,०१,९६७ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. मात्र, १८ मार्चपर्यंत केवळ ६९,७४८ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला. उर्वरित विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्याने रिक्त राहिलेल्या जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नाशिक जिल्ह्यातील परिस्थिती आणि प्रवेश प्रक्रियेत विलंब
नाशिक जिल्ह्यातील ४०७ शाळांमध्ये ५,२९६ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. यासाठी १७,३८५ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले होते. पहिल्या फेरीत ५,००३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. विद्यार्थ्यांना १८ मार्चपर्यंत प्रवेश घेण्यासाठी मुदत दिली होती. मात्र, अद्याप १,५३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे २४ मार्चपर्यंत प्रवेश न घेतल्यास, प्रतीक्षा यादीतील इतर विद्यार्थ्यांना सोडतीद्वारे प्रवेश देण्यात येईल.
पालकांसाठी महत्त्वाची सूचना
प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश १८ मार्चपासून सुरू झाले आहेत. यासाठी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना लघुसंदेशाद्वारे (SMS) माहिती दिली जात आहे. मात्र, पालकांनी केवळ संदेशावर विसंबून न राहता आरटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्जाची स्थिती नियमितपणे तपासणे गरजेचे आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेसाठी दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी आवश्यक कागदपत्रे सादर करून प्रवेश निश्चित करावा.
प्रवेश न घेतल्यास संधी गमावली जाणार!
२४ मार्चनंतर विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास, उर्वरित रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादीतील इतर विद्यार्थ्यांची नवीन सोडत काढण्यात येईल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत मोफत शिक्षणाची संधी मिळाली आहे, त्यांनी दिलेल्या मुदतीत प्रवेश घेऊन आपला हक्क निश्चित करावा.