महत्वाचे! कागदपत्रे जमा न केल्यास तुमचे फेब्रुवारीचे पैसे लटकणार! – Failure to Submit Documents Will Delay February Payments!
Failure to Submit Documents Will Delay February Payments!
शासनाच्या श्रावण बाळ निराधार योजना आणि संजय गांधी निराधार योजना राज्यातील निराधार व्यक्तींना महत्त्वाचा आधार पुरवते. मात्र, या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी कागदपत्रे वेळेत जमा करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, ज्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे जमा केली नाहीत, त्यांना अनुदानाची रक्कम मिळवण्यासाठी विलंब होऊ शकतो, आणि त्यांच्या फेब्रुवारी महिन्याचे पैसे अडकल्याची शक्यता आहे.
सध्याच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करून या योजनांचे लाभ मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार, लाभार्थ्यांना त्यांच्या कागदपत्रांची सादरीकरणे वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. तसेच, जर कोणत्याही लाभार्थ्याला अडचणींचा सामना करावा लागला, तर ते संबंधित तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभाग किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील विभागात संपर्क साधू शकतात.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नागपूर जिल्ह्यात या दोन्ही योजनांच्या जवळपास ३ लाख लाभार्थी आहेत. शासनाने थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांकडून कागदपत्रांची मागणी केली आहे. यासाठी कागदपत्रे जमा करण्यासाठी एक टाईमलाइन देखील दिली आहे, परंतु मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांनी कागदपत्रे अजूनही जमा केलेली नाहीत. डीबीटी पोर्टलवर नोंदणी केल्यावर आणि आधार कार्ड लिंक केलेल्यांना थेट खात्यात लाभ वितरण होईल. जर लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्यांना अडचणी येऊ शकतात.
कागदपत्रांची वेळेत सादरीकरण करणे आवश्यक आहे, विशेषत: आधार कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे. जर आधार कार्ड व्हॅलिड नसेल किंवा अपडेट केलेले नसेल, तर डीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे शक्य होणार नाही. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात जाऊन माहिती मिळवू शकता.
जिल्ह्यात एकूण ३ लाख लाभार्थी आहेत. नागपूर शहरात ७५ हजार लाभार्थी असून, सध्या ६७ टक्के लोकांनी कागदपत्रे जमा केली आहेत. उर्वरित ३३ टक्के लाभार्थ्यांची अनुदान रक्कम लटकण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.