भूमिअभिलेख विभागात ९०५ पदांची भरती लवकरच, राज्य सरकारची मान्यता | Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025  – As per the Latest Update received, Last year, about 700 out of 1200 posts of bhukarmapak –  land surveyors recruited in the Land Records Department had resigned due to getting a better government job option. Therefore, the state government has approved the recruitment of new posts in the vacant posts. Accordingly, now 700 land surveyors will be recruited in the Land Records Department. The Land Records Department said that this process will be started soon this bhukarmapak Bharti 2025 process.

The state government has given in-principle approval to the Land Records Department to recruit a total of 905 posts including stenographers and surveyors under Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025. This number will be increased as per the vacancies in the revenue divisions of Pune, Mumbai, Nashik, Chhatrapati Sambhajinagar, Amravati, Nagpur. The Land Records Department of the state government is very important in the revenue department. Land survey cases are settled through this department. For this, 1,200 land surveyors were recruited in the state two years ago. However, about 700 people resigned from their jobs due to various reasons.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Due to this, the posts of land surveyors working in various revenue departments became vacant. This started affecting the survey. Many surveys started getting pending. Keeping this in mind, a proposal was sent to the state government by the Land Records Department for the recruitment of land surveyors again in Bhumi Abhilekh Vibhag Recruitment 2025 Application Form Process.

This proposal has been accepted in principle. Meanwhile, along with these posts, the government has also approved recruitment for the posts of Stenographer (Upper Grade) and Stenographer (Lower Grade).

 

लघुलेखक, भूकरमापक (सर्व्हेअर) यांसह वेगवेगळ्या अशा एकूण ९०५ पदांसाठी भरती करण्यासाठी राज्य सरकारने भूमिअभिलेख विभागाला तत्त्वतः मान्यता दिली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या महसुली विभागात रिक्त पदानुसार ही संख्या वाढविण्यात येणार आहे. राज्य सरकारचा भूमिअभिलेख विभाग महसूल विभागात अत्यंत महत्त्वाचा आहे. या विभागाच्या माध्यमातून जमीन मोजणीच्या प्रकरणांचा निपटारा करण्यात येतो. त्यासाठी मागील दोन वर्षांपूर्वी राज्यात एक हजार २०० भूकरमापकांची पदभरती करण्यात आली होती. मात्र विविध कारणांमुळे सुमारे ७०० जणांनी नोकरीचा राजीनामा दिला.

त्यामुळे विविध महसूल विभागात कार्यरत असलेली भूकरमापकांची पदे रिक्त झाली. त्याचा परिणाम मोजण्यावर होऊ लागला. अनेक मोजण्या प्रलंबित राहू लागल्या. ही बाब लक्षात घेऊन पुन्हा भूकरमापकांच्या भरतीसाठी भूमिअभिलेख विभागाच्या वतीने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

हा प्रस्ताव तत्त्वतः मान्य करण्यात आला आहे. दरम्यान, या पदांबरोबरच लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी) या पदांसाठीदेखील भरती करण्याबाबत सरकारने मान्यता दिली आहे.भूमी अभिलेख विभागात भरती प्रक्रिया लवकरच होणार आहे. या नवीन माहिती नुसार ९०५ पदे रिक्त आहेत. ना नवीन रिक्त पदांच्या भरती प्रकियेला मान्यता देण्यात आली असून, नवीन पदभरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. या संदर्भातील परिपत्रक खाली दिले आहे. तसेच, या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उपरोक्त विषयांकित कामी संदर्भिय पत्र इकडील कार्यालयास प्राप्त झालेले असून यासोबत छायाप्रत पाठविण्यात येत आहे. सदरचे पत्रात भूमि अभिलेख विभागातील गट-क संवर्गातील सरळसेवेची माहे मे-२०२५ अखेरची रिक्त पदे भरण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने आपणास कळविणेत येते की, आपले विभागातील गट-क संवर्गातील माहे मे-२०२५ अखेर सरळसेवेची आपले विभागाची रिक्त पदाची माहिती यापूर्वीच खालील प्रमाणे या कार्यालयाकडे सादर करणेत आलेली आहे.

Bhumi Abhilekh Bharti 2025

 

भूमीअभिलेख विभागाने तीन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून भूकरमापकांच्या सुमारे १२०० पदांची भरती प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी सुमारे साडेआठ लाख उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षा दिली होती. त्यापैकी बारा हजार जण निवडीस पात्र होते. भूमीअभिलेखच्या विविध विभागांत नियमानुसार पदे देण्यात आली होती. त्यामधील बहुतांश उमेदवार निवड झालेल्या ठिकाणी प्रशिक्षणानंतर नोकरीवर रुजूदेखील झाले. पण नंतर काहींनी हळू हळू राजीनामे दिले.

 


महाराष्ट्र सरकार अंतर्गत येणार महत्वाचा विभाग म्हणजे “भूमी अभिलेख” , परंतु या भूमी अभिलेख विभागात कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांची तब्बल २५२८ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक १२४७ शिपायांची पदे भरली गेलेली नाही. जमिनीची मोजणी, मिळकतपत्रिका तयार करणे, रेकॉर्ड तयार करणे आदी कामे या विभागात होतात. मागील अनेक वर्षांपासून या विभागातील पदे भरण्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी तथा समन्वयक ई- फेरफार हे केवळ एक पद मंजूर आहे. तेही रिक्त ठेवण्यात आले आहे. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखची १३ पदे रिक्त आहेत. मंजूर ४३ पैकी ३० जागा भरल्या आहेत. लेखा अधिकाऱ्याचे मंजूर असलेले एकमेव पदही भरण्यात आलेले नाही. या विभागाती अडीच हजार पेक्षा जास्त रिक्त पदे येत्या नवीन वर्षात सरकार तर्फे भरती अपेक्षित आहे. कारण या रिक्त पदांमुळे कामांचे नियोजन पूर्ण पाने विस्कळीत झाले आहे. याचा फटका कामाच्या दिरंगाईच्या रूपाने सामान्य माणसाला सोसावा लागत आहे.  हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्वाचा विभाग आहे ज्यातून शासनाला चांगला महसूल मिळतो, आणि याचा विभागाकडे दुर्लक्ष होत आहे.  येत्या २०२५ मध्ये या विभाग पदभरती होईल अशी अपेक्षा आहे. 

Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024

उपअधीक्षक भूमी अभिलेख, नगर भूमापन अधिकारी, विशेष उपअधीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी, विशेष उपअधीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी (शहर मापन), विशेष उपअधीक्षक भूमी अभिलेख (गावठाण), कार्यालय अधीक्षक ही ४३१ पैकी तब्बल २० पदे रिक्त आहेत. सहायक लेखाधिकाऱ्यांची दोन पैकी केवळ एक जागा भरण्यात आली. उच्चश्रेणी लघुलेखक दोनपैकी एकच आहे. निम्नश्रेणी लघुलेखकांच्या नऊ पैकी चार जागा रिक्त आहेत. वाहन चालकांची ४८ पदे मंजूर आहेत. त्यातील केवळ १६ कार्यरत आहेत. वरिष्ठ लिपिक ३५, परीक्षक भूमापक-निमतानदार ८१, कनिष्ठ लिपिक ९०८, नाईक ११४ आणि शिपायांची १२४७ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे भूमी अभिलेख विभागात कामे वेळेत निकाली निघत नाही. परिणामी कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.

 

मोजणीच्या केसेस ऑनलाइन दिल्या जातात. एका कर्मचायांकडे २० ते २५ केसेस येतात. महिन्यातील कामाचे सर्व दिवस काम करूनही या केसेस निकाली निघत नसल्याचे कर्मचायांकडून सांगितले जाते.

 

 


Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025: The recruitment process in Land Records Department is in the final stage, 1 thousand 250 land surveyors will join the service from the month of May. This will help to settle the pending land enumeration cases. The exams were also conducted in November last year. Its result was also announced. Now the documents will be scrutinized. The final list of eligible candidates will be announced after April 21. Accordingly, the eligible candidates will be given the appointment letter to be admitted to the Land Records Service on May 1.

शहरातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदल्या, बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागेवर नव्याने होत नसलेली नियुक्ती तसेच नवीन भरती न होणे या समस्यांमुळे कार्यालयात कार्यरत असणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांवर कामांचा ताण पडत आहे. पाच कर्मचाऱ्यांपैकी दोघा-तिघांना अनेकवेळा शासकीय कामानिमित्त इतरत्र जावे लागते. तालुक्यातील आपापल्या कामांसाठी आलेले ग्रामस्थ कार्यालयात अपुरे कर्मचारी व कामास होत असलेला विलंब या कारणाने त्रस्त होत असुन त्याचे पर्यावसन वादावादीत होत आहे.

भूमापन कार्यालयातही आता मोजणी, पोट हिस्सा मोजणी, बिनशेती मोजणी तसेच मोजणी शुल्क हे गुगल पेद्वारे आकारण्यात येते. सध्याचे युग नईड भ्रमणध्वनी असले तरी बहुतांश नागरिक भ्रमणध्वनीचा वापर करीत नाही. शुल्क हे गुगल पे करावयास सांगण्यात आल्यावर भ्रमणध्वनीत गुगल पे सुविधा नसल्याने नागरिक आणि कर्मचाऱ्यांमधे वादावादी होताना दिसते. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच रोख रक्कम घेत शुल्क आकारावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.

जमीन मोजणीचे काम करणाऱ्या भूकरमापकांची राज्यात पदे रिक्त आहेत. राज्यातील भूमी अभिलेख विभागात विविध प्रकारची एकूण चार हजार पदे आहेत. त्यापैकी भूकरमापकांची दीड हजार पदे रिक्त आहेत.

 

भूमिअभिलेख विभागांतर्गत विविध पदांवरील कर्मचाऱ्यांमार्फत फेरफार उतारा, तसेच जमिनीच्या नोंदी, मोजणी याचे काम करण्यात येते. जमीन मोजणीचे काम करणाऱ्या भूकरमापकांची राज्यात पदे रिक्त आहेत. राज्यातील भूमिअभिलेख विभागात विविध प्रकारची एकूण चार हजार पदे आहेत. त्यापैकी भूकरमापकांची दीड हजार पदे रिक्त आहेत. यातील १ हजार २५० पदे भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे जमिनीच्या मोजणीच्या कामांना वेग येत नसल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या परीक्षेचा निकालही जाहीर झाला आहे.

निकाल जाहीर झाल्याने उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या वर्गवारीनुसार कागदपत्रांची छाननी केली जाणार आहे. त्यात पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची २१ एप्रिलनंतर अंतिम यादी जाहीर केली जाईल. त्या यादीनुसार पात्र उमेदवारांना येत्या एक मे रोजी भूमिअभिलेख सेवेत दाखल करण्याचे नियुक्तिपत्र दिले जाईल. त्यामुळे मेपासून पुण्यासह राज्यात १२५० भूकरमापक सेवेत रुजू होतील. परिणामी, मोजणीच्या प्रक्रियेला गती येईल.
– आनंद रायते, अतिरिक्त आयुक्त, जमाबंदी विभाग


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड