वसईत तहसील मध्ये ७५ पदे रिक्त! नवीन पदभरती प्रक्रिया..! – Vasai Tahsil Office Vacancies
Vasai Tahsil Office Vacancies
Vasai Tahsil Office Vacancies सध्या वसई तहसील ऑफिसमध्ये सरकारी कर्मचारीच नाहीत म्हणावं इतकी बिकट अवस्था झालीय! सध्या १४४ पदांपैकी फक्त ६९ लोकच नोकरीवर आहेत, उरलेली ७५ पदं रिकामी आहेत. एवढ्या मोठ्या रिक्त जागांमुळे सर्वसामान्य नागरिकांची कामं वेळेवर होत नाहीत आणि त्यामुळेच दलालांचं फावतंय. या मुळे नागरिकांची अनेक काम खोळंबली आहे. या रिक्त पदांमुळे अनेकाना त्रास होत आहे. तेव्हा नवीन पदभरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यता यावी अशी मागणी जोर धरत आहे.
तहसीलदारांनी रिक्त पदांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली पण अजूनही काहीच हालचाल नाही. त्यामुळे आता नागरिकांच्या कामासाठी ऑफिसात आले की त्यांना चकरा माराव्या लागतात आणि कामं लांबट चालतात. सध्या ऑफिसात जवळपास ६०-७० खाजगी लोक काम करतायत. पण त्यांना पगार कोण देतं? हेच कुणाला माहिती नाही – म्हणजे बिनधास्त प्रकरण!नायब तहसीलदाराच्या ४ पदांपैकी २ अजून भरायची आहेत. महसूल सहाय्यकाच्या १९ जागांपैकी ९ अजून रिकाम्या. तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, वाहनचालक, वरिष्ठ कारकून – या सगळ्या पदांची वर्षानुवर्षे भरतीच नाही!
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
यामुळे सगळा ताण सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांवर येतोय. कामं वेळेत होत नाहीत, कागदपत्रं हरवतात, टपाल महिन्यन्महिने पडून असतो, केसचं ऐकणं होत नाही – आणि सगळ्याची चिडचिड नागरिकांना सहन करावी लागते. आता अधिकारी म्हणतात, “दोन कर्मचारी असले तरी सेवा देऊ!” पण प्रश्न असा की दर्जा कसा राहणार? आणि वेळेत कामं होणार का?