लाडक्या बहिणींनो… एप्रिलचा हफ्ता अजूनही वाट बघतोय का? 30 एप्रिल पर्यंत मिळणार हफ्ता | Waiting for April Payout?
Waiting for April Payout?
राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करून अनेक महिलांना आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. या योजनेतून दरमहिना ₹1500 थेट महिलांच्या खात्यात जमा होतो. मात्र एप्रिल महिना सरत आला तरी अजूनही हफ्ता जमा झालेला नाही, यामुळे अनेक महिलांमध्ये नाराजीचं वातावरण दिसून येतंय.
गुढीपाडवा गेला, आता अक्षय्य तृतीयाही… पण हफ्ता कुठंय?
महिला व बालविकास विभागानं यापूर्वी जाहीर केलं होतं की एप्रिल महिन्याचा हफ्ता गुढीपाडवा किंवा ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेनिमित्त लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. पण प्रत्यक्षात एप्रिलच्या मध्यावर येऊनही हफ्ता आला नाही हे लक्षात आल्यावर अनेक बहिणी निराश झाल्या.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
भुजबळांचं मोठं वक्तव्य – ‘‘पैसे मिळणारच मिळणार!’’
अखेर या विषयावर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की, “हा पैसा सरकारचा आहे आणि सरकार कुणाचं बकाया ठेवणार नाही. लाडकी बहिण योजनेचा हफ्ता थोडा उशिरा येतोय, पण नक्की मिळणार आहे.” यावर महिलांना दिलासा मिळाला, कारण थेट मंत्र्यांनी खात्री दिली.
सरकारी योजना आणि पैसे मिळण्यात होणारा उशीर – सामान्य बाब
भुजबळ म्हणाले की, “संजय गांधी निराधार योजना, शिवभोजन योजना अशा अनेक योजनांचे पैसे सुद्धा अनेक वेळा एक-दोन महिने उशिरा मिळतात. यामागे अनेक प्रशासकीय प्रक्रिया असतात. त्यामुळे थोडा संयम बाळगा, पण आपल्या हक्काचे पैसे कुठे जाणार नाहीत.”
‘‘पैसे कुठे जात नाहीत, पण खर्चाचं नियोजन कोसळतं’’
मंत्री पुढे म्हणाले, “सामान्य घरांमध्ये ठराविक उत्पन्न असतं. त्यात जर एखादा मोठा खर्च आला, तर इतर बाबतीत ओढाताण होते. हे आम्हालाही समजतं. पण सरकार जे वचन देतं ते पाळतं. त्यामुळे बहिणींनो चिंता नको.”
‘लाडक्या बहिणीं’ना सरकारनं दिलेली दिलासादायक ग्वाही
भुजबळ यांच्या विधानामुळे महिलांना आश्वासन मिळालं आहे की एप्रिलचा हफ्ता नक्की येणार. काही आर्थिक व प्रशासकीय अडचणीमुळे उशीर होतोय, पण खात्यात पैसे येतील याची खात्री त्यांनी दिली आहे.
लाडक्या बहिणींच्या डोळ्यांत आता आशेचा किरण
गेल्या काही महिन्यांपासून या योजनेमुळे अनेक महिलांना रोजचं जीवन अधिक सुलभ झालंय. त्यांना घरखर्च, मुलांचं शिक्षण, औषधं अशा अनेक गोष्टींसाठी मदत मिळते. त्यामुळे प्रत्येक महिन्याचा हफ्ता महिलांसाठी फारच महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा हफ्ता लवकर मिळावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.
थोडा धीर धराच बहिणींनो… पैसा पक्का मिळणार!
शेवटी एवढंच म्हणता येईल की, “थोडा उशीर होऊ शकतो, पण सरकार आपल्या लाडक्या बहिणींना विसरणार नाही.” भुजबळांच्या शब्दांतूनही हेच उमटलं की योजना टिकवणं हे सरकारचं कर्तव्य आहे, आणि लाभार्थ्यांचा विश्वास टिकवणं ही जबाबदारी!