MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा ठरल्या वेळेस च होणार !-Mains On Schedule!
Mains On Schedule!
राज्यात मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर एमपीएससीच्या २०२४ च्या नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी काही एसईबीसी उमेदवारांनी ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र न देता अर्ज केले, त्यामुळे त्यांचे अर्ज बाद झाले. हे उमेदवार मग थेट ‘ईडब्ल्यूएस’मध्ये राहिले. या सगळ्या गोंधळात आयोगाने पूर्व परीक्षेचा सुधारित निकाल काढून ३१८ नवीन ‘ईडब्ल्यूएस’ उमेदवारांना अर्जाची संधी दिली.
मुख्य परीक्षेसाठी अर्ज करताना एसईबीसी उमेदवारांना ‘नॉन क्रिमिलेअर’ आहे की नाही, हे पुन्हा सांगण्याची संधीही दिली गेली. मुख्य परीक्षा २६ ते २८ एप्रिल २०२४ दरम्यान होणार आहे. आता जे ३१८ नवीन उमेदवार निकालात पात्र ठरले, त्यांना अभ्यासासाठी वेळ कमी मिळतोय, म्हणून काही जण परीक्षा पुढे ढकला, अशी मागणी करत होते.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आता काय ठरलं आयोगाच्या बैठकीत?
मंगळवारी झालेल्या बैठकीत आयोगाने स्पष्ट केलं की, परीक्षा ठरल्याप्रमाणेच होणार! मुदतवाढ ९ एप्रिलपर्यंत दिली होती, आणि ७,९७० पात्र उमेदवारांपैकी ७,७३२ जणांनी आधीच अर्ज केलेत. उरलेल्यांसाठीही ऑनलाइन प्रणाली व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणीचं कारण देऊन परीक्षा पुढे ढकलायची गरज नाही, असं ठाम सांगितलं गेलंय.
अर्ज करताना अडचण आहे? मग काय करायचं?
ज्यांना अर्ज करताना काही तांत्रिक किंवा इतर अडचण येत असेल, त्यांनी हेल्पलाईनवर किंवा ईमेलवर संपर्क करावा:
- हेल्पलाइन क्रमांक: ७३०३८२१८२२ / ०२२-६९१२३९१४
- ईमेल: contact-secretary@mpsc.gov.in
आखरी सूचना काय आहे?
आयोगाने ठामपणे सांगितलं आहे की, विहित मुदतीनंतर अर्ज किंवा परीक्षा शुल्काबाबत कुठलाही बदल किंवा विनंती मान्य केली जाणार नाही. त्यामुळे, परीक्षा ठरल्याच वेळेसच होणार – पुढे ढकलली जाणार नाही!