तरुणांसाठी आनंदवार्ता !! अकोला जिल्ह्यात २ हजार पेक्षा अधिक रोजगारांची संधी !
2000+ Job Opportunities!
अकोला जिल्ह्यातील तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी! जिल्हा गुंतवणूक परिषदेमध्ये तब्बल १,२३८ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून, २,००० पेक्षा अधिक रोजगार संधींचे दार उघडले गेले आहे. ९५ उद्योग-व्यवसायांशी झालेले हे करार जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दिशेने मोठे पाऊल ठरत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिली.
सध्या अकोला जिल्ह्याचा जीडीपी सुमारे ३६,००० कोटी रुपये असून, तो २०२८ पर्यंत दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या उद्दिष्टासाठी रेल्वे, वैद्यकीय सुविधा, विमानतळ विस्तार आणि एमआयडीसी क्षेत्र विस्तारासारख्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
उद्योगांना चालना देणारे निर्णय: राज्य शासनाच्या ‘सातकलमी कार्यक्रमा’नुसार गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी ‘Ease of Living’, जलद परवानगी प्रक्रिया आणि ‘मैत्री 2’ एकल खिडकी प्रणालीद्वारे सुलभ सेवा दिल्या जात आहेत. उद्योजकांना अडथळे आल्यास थेट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचेही आवाहन करण्यात आले.
विशेष गुंतवणूक प्रकल्प:
- रिलायन्स सीएनजी प्रकल्पातून एकट्या १२० कोटींची गुंतवणूक
- जिल्हा उद्योग केंद्र व अकोला औद्योगिक संघटना यांच्या पुढाकारातून परिषद यशस्वी
जिल्ह्यातील विकासाला चालना देणारी ही परिषद स्थानिक उद्योजक आणि गुंतवणूकदारांना एक व्यासपीठ देत असून, जिल्ह्याला एक औद्योगिक हब म्हणून उभारण्याच्या दिशेने ही सुरुवात ठरत आहे.