Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ज्यांची पदवी परीक्षा हुकली, त्यांची परीक्षा दिवाळीनंतर

Final Year Exams 2020

Final Year Exams 2020 : कोविड-१९ मुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. त्या विद्यार्थ्यांची पदवी परीक्षा दिवाळीनंतर होणार आहे….

Final Year Exam 2020: राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या / अंतिम सत्राच्या परीक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऑनलाइन आणि अपवादात्मक परिस्थितीत ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. या सर्व परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या असून काही परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली.

कोविड-१९ मुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. त्या विद्यार्थ्यांची परीक्षा दिवाळीनंतर १५ दिवासांमध्ये घेण्याचे निर्देश विद्यापीठांना देण्यात आले असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले. आज मंत्रालयात सामंत यांनी सर्व कुलगुरुंची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन परीक्षा आणि निकालाचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

कोविड-१९ मुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. त्या विद्यार्थ्यांची परीक्षा दिवाळीनंतर १५ दिवासांमध्ये घेण्यासाठी संबंधित विद्यापीठाने नियोजन करावे, तसेच जे विद्यार्थी यावर्षी नापास झाले आहेत. त्या विद्यार्थ्यांची परीक्षा एक महिन्यात घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. असे सांगून सामंत यांनी कोविडचे संकट असतानासुद्धा सर्व विद्यापीठाने यशस्वीपणे परीक्षा प्रक्रिया यशस्वी राबविली त्याबद्दल सर्व कुलगुरु आणि परीक्षेशी संबंधित असलेले सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

आज काही विद्यापीठांनी निकाल जाहीर झालेल्या विषयांचे प्रातिनिधीक स्वरुपात विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली. या गुणपत्रिकेमध्ये कोणताही बदल नाही. मागच्या वर्षाप्रमाणेच ही गुणपत्रिका देण्यात आली. तसेच पदवी समारंभामध्येसुद्धा मागच्या वर्षाप्रमाणेच पदवी देण्यात येणार आहे.

विद्यापीठाने कोविडच्या पार्श्वभूमिवर सर्व उपाययोजना करुन परीक्षा यशस्वीपणे राबविली. एकाही विद्यार्थ्यांला कोविडची बाधा होणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली आहे. तसेच ज्या विद्यापीठांमध्ये परिक्षेसंदर्भात तांत्रिक अडचणी आल्या आहेत, त्यासंदर्भात सत्यशोधन समिती गठीत केली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) मार्गदर्शक सूचनानुसार शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासंदर्भात दिवाळीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरुंसोबत बैठक घेवून त्यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन परिषदेची बैठकीत चर्चा करुन राज्यातील कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेवून शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. या सर्व परीक्षांचा अहवाल राज्यपाल महोदयांकडे पाठविण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.


Final Year Exams 2020 : अंतिम वर्षाच्या वंचित विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षा; ऑनलाइन पद्धतीने ५ ते ७ नोव्हेंबरपर्यंत आयोजन

अंतिम वर्षातील अंतिम सत्राची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे नोव्हेंबरमध्ये पुनर्परीक्षा घेण्यात येणार आहे.

पुनर्परीक्षा घेण्याचे नियोजन

कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत वेळेत निर्णय होऊ शकला नाही. अखेर न्यायालयात सुनावणीनंतर यंत्रणा कामाला लागली होती. विद्यार्थांचे नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन असे दोन्ही पर्याय विद्यार्थांना उपलब्ध करून देण्यात आले. त्यानुसार गेल्या १२ ऑक्टोबरपासून ऑनलाइन व ऑफलाइन सुरू झालेल्या या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे परीक्षा लॉगीन न होणे, परीक्षा सुरू होणे, सर्व्हर एरर, टेक्स्ट सबमिट न होणे, चुकीच्या प्रश्‍नपत्रिका उपलब्ध होणे, राज्य सामाईक परीक्षा (सीईटी) व अन्य शासकीय स्पर्धा आदी परीक्षांसोबतच विद्यापीठाच्या परीक्षा आदी कारणांमुळे अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. त्याअनुषंगाने प्राप्त झालेल्या तक्रारींबाबत बैठक होऊन येत्या ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन स्वरूपात पुनर्परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

वेबपोर्टलवरील गुगल फॉर्ममध्ये माहिती भरावी

ज्या विद्यार्थ्यांकडून तक्रारी आल्या, अशाच विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे संबंधित अपेक्षित तपशील व अन्य माहिती २ नोव्हेंबरपर्यंत पाठवली जाणार आहे. तक्रारी प्राप्त होऊनही ज्यांना ऑनलाइन परीक्षेबाबत ई-मेल प्राप्त झालेले नसतील, अशा विद्यार्थ्यांनी ३ नोव्हेंबरला रात्री बारापर्यंत विद्यापीठाच्या वेबपोर्टलवरील गुगल फॉर्ममध्ये माहिती भरावी, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले.

सोर्स : सकाळ


Final Year Exams 2020 : राज्यातील विद्यापीठांना आता परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदतवाढ मिळाली आहे.

अंतिम वर्ष परीक्षा घेऊन निकाल जाहीर करण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठांना ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदतवाढ मिळाली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने याबाबत विद्यापीठाला पत्र लिहून ही परवानगी दिली आहे.

अंतिम वर्ष परीक्षा घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने २८ ऑगस्ट रोजी दिलेल्या निर्णयानुसार राज्यातील विद्यापीठांना ऑनलाइन, ऑफलाइन परीक्षा घेणे बंधनकाकर झाले. विद्यापीठ आयोगाच्या ६ जुलैच्या मार्गदर्शक सुचनांनुसार विद्यापीठांना ही परीक्षा प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र याच निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने ज्या राज्यांना ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणे शक्य नाही अशा राज्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाकडे परवानगी मागावी असेही म्हटले होते. यानुसार राज्य सरकारने आयोगाकडे राज्यातील विद्यापीठांना परीक्षा घेण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदत द्यावी अशी विनंती केली होती.

Final Year Exams 2020

यानुसार आयोगाने मुदतवाढ मंजूर केली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव राजीव जलोटा यांना पत्राद्वारे आयोगाने ही बाब कळवली आहे. या पत्रानुसार आता राज्यातील विद्यापीठांना ३१ ऑक्टोबरपर्यंत परीक्षा प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. परीक्षा प्रक्रिया सुरू असतानाच मूल्यांकनाचे कामही सुरू करावे जेणेकरून निकाल वेळत लावणे शक्य होईल, अशी सूचनाही आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी या पत्रात केली आहे.

राज्यातील विद्यापीठे सज्ज

राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा या ३१ ऑक्टोबरपूर्वी होतील, असे नियोजन राज्यातील विद्यापीठांनी केले आहे. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत सध्या राज्यातील विद्यापीठांचा दौरा करून आढावा घेत आहेत. गुरुवारी एसएनडीटी महिला विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठातील आढावा बैठक पार पडल्याचे सूत्रांनी सांगितले.

पदव्युत्तर पदवीचे प्रवेश नोव्हेंबरपासून

राज्यातील विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊन लवकरात लवकर निकाल जाहीर करावा अशी सूचना अनुदान आयोगाच्या पत्रात देण्यात आली आहे. यानंतर तातडीने नोव्हेंबरच्या सुरुवातीला पदव्युत्तर पदवी तसेच पी. एचडी.ची प्रवेशप्रक्रिया सुरू करावी अशी सूचनाही आयोगाने पत्रात केली आहे.

परीक्षा अर्जासाठी आणखी मुदत

काही कारणामुळे परीक्षा अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थांसाठी विशेष बाब म्हणून विद्यापीठाने १८ ते २० सप्टेंबरपर्यंत वाढीव कालावधी दिलेला आहे. या वाढीव कालावधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन सामंत यांनी केले आहे. अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असेही त्यांनी स्पष्ट केले. याचबरोबर अंतिम वर्षाच्या विद्यार्थांना विद्यापीठाकडून सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली जाणार आहे, असेही सामंत गुरुवारी म्हणाले.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड